औरंगाबाद – राज्यात आरक्षणाची लढाई ईरेला पेटली आहे. पंढरपूर, वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीत आरक्षण आणि आरक्षण बचाव या दोन्हीसाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व आंदोलनांना धार आली आहे. त्यातच आता मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे.
राज्यात आरक्षणाची लढाई अटी-तटीवर आली आहे. मराठा आंदोलक ओबीसी आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणून असे तीन ध्रुव झाले आहेत.
